1. प्रश्न : कृ षीचे व्यापारीकरण म्हणजे काय ते सांगून कृ षीच्या व्यापारीकरणाची कारणे व परिणाम लिहा.
१. भारतीय महसूल व्यवस्था
● भारत हा कृ षिप्रधान देश असून लोकांच्या उपजीविक
े चे मूलभूत साधन शेती होते.
● स्वयंपूर्ण ग्रामजीवन हे भारताच्या कृ षी अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्ये होते.
● शेत जमीन ही गावाच्या मालकीची असत. ती कसायला शेतकऱ्यांना दिली जात.
● कृ षी उत्पादन हे क
ु टुंब व गावाच्या गरजा भागविण्यासाठी असत.
● गाव हा महसूल आकारणीचा घटक होता.
● महसूल आकारताना त्यावर्षीचे उत्पादन विचारात घेतले जाई.
● महसूल धान्यरूपात घेतला जात.
● तक्रारींचा न्यायनिवाडा गावची पंचायत करीत असे.
● भारतातील ही व्यवस्था ब्रिटिश काळात समाप्त झाली.
२. ब्रिटिशांच्या महसूल व्यवस्था पद्धतीची वैशिष्ट्ये
● जमिनीची मालकी गावाच्या ऐवजी खाजगी करण्यात आली.
● भारताच्या काही भागात जमीनदार तर काही भागात शेतकरी जमीन मालक बनले.
● नव्या व्यवस्थेत जमीन विकणे, गहाण टाकले किं वा जमिनीचे विभाजन करणे शक्य होते.
● गावा ऐवजी जमीन मालकांकडून महसूल घेण्यात येऊ लागला.
● महसूल आकारणी उत्पादनानुसार नाही तर जमिनीच्या निकषावर क
े ली जात असे.
● जमीन महसूल रोख पैशातच द्यावा लागत असे.
● महसूल वेळेवर भरला नाही तर शेतकऱ्याला दंड होत असे, प्रसंगी जमीन गमवावी लागत असे.
● वेळेवर रोखीचा महसूल भरण्यासाठी शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्ज घ्यावे लागत.
● जमीन विषयक व महसूल विषयक वादांचा निर्णय सरकारनिर्मित न्यायालये देऊ लागली.
या न्याय पद्धतीत लेखी कागदाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने जमीनदार व सावकार त्याचा
गैरफायदा घेत असे.
अशाप्रकारे ब्रिटिश महसूल व्यवस्थेत सरकारी, जमीनदारी व सावकारी असे तिहेरी पाश
शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती आवळले गेले.
३. भारतीय शेतीची दुर्दशा : प्रामुख्याने खालील घटक कारणीभूत ठरले.
● ब्रिटिशांचे शोषणाचे धोरण व अतिरिक्त महसूल वसुली.
● भारतीय शेती विषयी ब्रिटिश सरकारची अनास्था.
● कृ षी क्षेत्रावरील वाढता बोजा.
● जमीनदारीचा व सावकारीचा विकास.
● शेतकऱ्यांचे वाढते दारिद्र्य व कर्जबाजारीपणा.
● शेत जमिनीचे वाढते विभाजन.
● आधुनिकतेचा कृ षी क्षेत्रातील अभाव.
या पार्श्वभूमीवर भारतीय कृ षीचे व्यापारीकरण घडून आले नव्हते तर ते ब्रिटिशांनी घडवून आणले.
१. कृ षीचे व्यापारीकरण :-
2. कौटुंबिक व स्थानिक वापरापुरते नवे तर बाजारपेठेत शेतमाल विक
ू न नफा मिळविण्यासाठी म्हणजे व्यापारी
उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून उत्पादन करणे याला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात.
या प्रक्रियेत भांडवलशाही हेतूंनी नगदी पिक
े काढण्यावर भर असतो ब्रिटिश कालखंडात गहू चहा ऊस कापूस
ताग नीड तंबाखू इत्यादी पिकांचे व्यापारी व विस्तारित उत्पादन सुरू झाले.
२. व्यापारी करण्याची कारणे
1. शेतकऱ्यांना रोख रकमेची गरज
● जमीन महसूल रोख रकमेत व वेळेवर भरावा लागत असे त्यासाठी रोख पैशाची गरज.
● महसूल रोखीने भरण्यासाठी शेतकरी कर्ज घेत त्यामुळे सावकाराचे व्याज देण्यासाठी व कर्जफ
े डीसाठी
रोख रकमेची गरज.
● बाजारपेठेतून व जत्रेतून आवश्यक माल खरेदी करण्यासाठी.
परिणामी शेतकऱ्यांना नगदी पिकांकडे वळावे लागले.
2. दळणवळणाच्या आधुनिक साधनांचा विकास
● रेल्वे व दळणवळणाच्या इतर आधुनिक साधनांचा विकास झाल्यामुळे खेड्या-खेड्यातील चलन-वलन
वाढले.
● बाहेरचा माल खेड्यात येऊ लागला व खेड्यातील माल बाहेर जाऊ लागला. त्यामुळे खेडी बाजारपेठांशी
जोडली गेली. त्यामुळे शेतकरी नगदी पिक
े घेण्याकडे वळले.
3. खेड्यांची स्वयंपूर्णता समाप्त
● ब्रिटिशांच्या उद्योग विषयक धोरणामुळे भारतातील लघु व क
ु टीर उद्योगांचा ऱ्हास घडून आला.
● त्यामुळे गावाच्या गरजा गावात भागेनाशा झाल्या.
● खेड्यातील शेतकऱ्यांना बाजारपेठांवर अवलंबून राहावे लागत व त्यासाठी रोख पैसे लागत असल्याने
शेतकरी नगदी पिक
े घेऊ लागले.
4. सुऐझ कालवा वाहतुकीसाठी खुला
● सेऐझ कालवा सुरू झाल्याने इंग्लंड व भारतातील समुद्री अंतर 3000 मैलांनी कमी झाले.
● आधुनिक जहाजांमुळे प्रवासाला लागणारा वेळ कमी झाला. मालवाहतुकीचा खर्चही कमी झाला. त्यामुळे
अधिक वेगवान व मोठ्या प्रमाणावर व्यापारी उलाढाल शक्य झाली.
● परिणामी ग्रामीण बाजारही विदेशी वस्तूंनी गजबजू लागले. त्यामुळे शेतकरी नगदी पिकाकडे वळले.
5. अमेरिक
े त यादवी युद्ध
● अमेरिक
े त 1860 ते 1865 या काळात यादवी युद्ध झाल्याने त्याचा अमेरिकन कापसाच्या निर्यातीवर
विपरीत परिणाम झाला.
● अमेरिकन कापसाभावी इंग्लंडमध्ये भारतीय कापसाला असणारी मागणी सुमारे 6 ते 7 पटींनी वाढली
त्यामुळे शेतकरी कापसाच्या पिकाकडे वळले.
3. 6. सरकारकडून नगदी पिकांना प्रोत्साहन
● इंग्लंडच्या व्यापारी व औद्योगिक हितसंबंधासाठी ब्रिटिश सरकारने भारतात नगदी पिकांच्या उत्पादनाला
महत्त्व दिले.
● चहा, साखर, कापूस, नीळ, तंबाखू, अफ
ू इत्यादी पिकांकडे लक्ष देऊन ती पिक
े काढण्यास शेतकऱ्यांवर
सक्ती करणे सुरू क
े ले.
● ब्रिटिश मळेवाल्यांनी भारतात भांडवल गुंतवून वरील पिकांच्या उत्पादनास प्रचंड सुरुवात क
े ली.
वरील कारणांमुळे भारतात शेतीच्या व्यापारीकरणाला चालना मिळाली. भारतीय शेतकऱ्यांची अगतिकता
व ब्रिटिशांचे आर्थिक हितसंबंध या दोन गोष्टी एकत्र आल्या आणि शेतीचे व्यापारीकरण सुरू झाले.
● बाजारपेठेत विकण्यासाठी नगदी पिक
े काढली जाऊ लागली.
● विशिष्ट भागात विशिष्ट पिक
े घेतली जाऊ लागली.
● उदाहरणार्थ पंजाबमध्ये गहू, बंगालमध्ये ताग, वऱ्हाडात कापूस इत्यादी.
● इच्छा असो वा नसो शेतकऱ्यांना विशिष्ट पिक
े काढावीच लागत असत. महसूल अधिकारी, जमीनदार,
सावकार यांच्याद्वारे शेतकऱ्यांवर दबाव आणला जात असे. अशा रीतीने शेतीचे व्यापारीकरण ही
भारतातील शेतकऱ्यांवर लादलेली प्रक्रिया होती.
३. शेतीच्या व्यापारीकरणाचे परिणाम
1. अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली /स्वस्त धान्य दुर्लक्षित
● शेतीच्या व्यापारीकरणामुळे नगदी पिकांना महत्त्व आले.
● नगदी पिकांचे क्षेत्र वाढले तर अन्नधान्याच्या पिकांचे क्षेत्र कमी झाले. त्यामुळे भारतात अन्नधान्याची
टंचाई निर्माण झाली.
● जनतेला लागणारी ज्वारी, बाजरी सारखी स्वस्त धान्य दुर्लक्षित होऊ लागले. गरिबांच्या अन्नाच्या
तुटवड्यामुळे दुष्काळात जनतेचे हाल होऊ लागले.
2. शेतकऱ्यांची स्वावलंबता समाप्त झाली.
● शेतीच्या व्यापारीकरणाआधी शेतकरी अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होता.
● व्यापारीकरणानंतर तो नगदी पिकांकडे वळला त्यामुळे धान्याकरीता त्याला बाजारावर अवलंबून राहावे
लागू लागले.
3. शेतीच्या बाबतीत प्रादेशिक विशेषीकरण वाढत गेले
● ज्या प्रदेशात जे नगदी पीक उत्तम येऊ लागले तेच पीक त्या प्रदेशात घेतले जाऊ लागले. त्यामुळे विशिष्ट
प्रदेश विशिष्ट पिकांकरिता ओळखला जाऊ लागला.
● उदा. वराड -कापूस, संयुक्त प्रांत -ऊस, दक्षिण भारत -कॉफी, आसाम -चहा, बंगाल -ताग, बिहार नीळ
इत्यादी.
4. शेतकऱ्यांच्या दारिद्र्य व कर्जबाजारीपणात वाढ
4. ● महसूल भरणा व कर्जफ
े ड करण्यासाठी रोख पैसा मिळावा म्हणून शेतकऱ्यांना आपला माल बाजारात
विकावा लागत.
● शेतकरी माल विकत (कापणी नंतर) तेव्हा किमती घसरलेल्या असत तर शेतकऱ्यांना धान्य घेण्याची
पाळी येत तेव्हा मात्र किमती वाढलेल्या असत.
● अशा प्रकारे शेतकऱ्यांना नुकसानीचा व्यवहार सोसावा लागत असे. परिणामी त्यामुळे शेतकरी दरिद्री व
कर्जबाजारी होत.
5. खेडी शहरांवर अवलंबून राहू लागली
● व्यापारीकरणाने ग्रामीण स्वयंपूर्णता मोडीत निघाली त्यामुळे ग्रामीण भागाला शहरांवर अवलंबून राहावे
लागत.
● उदाहरणार्थ शेतीची कामे संपल्यावर लोक पूरक व्यवसाय करीत. परंतु शिंपी, माळी, दुकानदार, कारागीर
आता याच गरजांच्या पूर्ततेसाठी शहरांकडे वळू लागले.
6. नगदी पिकांच्या उत्पादन क्षेत्रात वाढ
● जॉर्ज ब्लीनच्या आकडेवारीनुसार 1901 ते 1937 या दरम्यान ऊस उत्पादन क्षेत्र जमिनीत 69 टक्क
े वाढ
झाली. कापूस 59% ,सरसो 36 टक्क
े , ताग 14% याप्रमाणे उत्पादित जमीन क्षेत्रात वाढ झाली.
● 1891 ते 1946 दरम्यान नगदी पिकांचे एक
ू ण उत्पादनात प्रति दशकात सुमारे 13 टक्क
े वाढ झाली.
7. शेती क्षेत्रात गुंतवणूक वाढली/ब्रिटिश साम्राज्यवाद्यांना विशेष फायदा.
● शेतीच्या व्यापारीकरणातील फायदा लक्षात घेऊन ब्रिटिश भांडवलदाराने शेतीत गुंतवणूक वाढवली.
● आसाम, बंगाल, बिहारचा उत्तर भाग इत्यादी प्रदेशात युरोपियन मळेवाल्यांनी आपले भांडवल गुंतविले.
● विशेषता चहा, नीळ, कॉफी, ताग या नगदी पिकांचे उत्पादन करून त्यांची निर्यातही ते करू लागले.
● या सर्व व्यवहारातील प्रचंड नफा इंग्लंडला मिळत होता.
8. दुष्काळ पडले
● भारतातील काही दुष्काळ हे नैसर्गिक होते तर काही ब्रिटिशांनी शेतकऱ्यांवर अन्याय लादले होते. त्यामुळे
शेतकऱ्यांनी शेती करणे बंद क
े ल्याने निर्माण झाले होते.
● दुष्काळांमुळे प्राणहाणी झाली, शेतीचे अतोनात नुकसान झाले, अन्नधान्याच्या किमती वाढल्या,
सरकारने उपाययोजना क
े ली नाही म्हणून काही भागात शेतकऱ्यांनी उठाव क
े ले.
9. ब्रिटिशन खालोखाल भारतीय जमीनदार, सावकार व दलाल यांना व्यापारी करण्याचा फायदा मिळाला.
10. जमीन संबंधावर परिणाम
● शेतीच्या व्यापारीकरणाने जमीन ही विक्री योग्य वस्तू बनली.
● शेतीशी संबंधित नसलेले श्रीमंत लोक जमीन खरेदी करू लागले.
● उपऱ्या जमीनदारांच्या संख्येत वाढ होऊ लागली आणि अधिकाधिक शेतकरी दरिद्री व भूमिहीन होऊ
लागले.
5. 11. शेतमजुरांचे स्थलांतर सुरू झाले
● उदाहरणार्थ बिहार आणि उत्तर प्रदेशातील अनेक मजूर चहाच्या मळ्यात काम करण्यासाठी आसाममध्ये
स्थलांतरित झाले.
● मजूर पुरवठा करून नफा मिळविणारे दलालही पुढे आले.
12. खेड्यांचे एकाकीपण समाप्त झाले
● शेतीच्या व्यापारीकरणामुळे ग्राम ग्रामाच्या बंदिस्त कोशातून बाहेर पडून भारतातील सामान्य जन अधिक
मोठ्या विश्वासी जोडले गेले. या प्रक्रियेने राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या विकासाला हातभार लावला.
● शेती क्षेत्रात मध्ययुगीन सरंजामशाही उत्पादन पद्धतीची जागा आधुनिक भांडवलशाही उत्पादन
पद्धती घेऊ लागली.